पूण्यश्लोक न्यूज
"
श्रद्धेनुसार असे मानण्यात येते की,प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असत आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असे. त्यामुळे याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज आहे आणि म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो आणि हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येतो.तसंच देवी पार्वती यांनी या महिन्यात युवावस्थेत असताना केवळ शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर उपवास केला आणि त्यांच्या या कठोर तपस्येला याच महिन्यात शंकर भगवान यांनी फळ दिले.या महिन्यात करण्यात आलेल्या तपस्येचे चांगले फळ मिळते असा समज असल्याने श्रावण महिना साजरा करण्यात येतो.
श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरचा पाचवा महिना आहे.भारताच्या राष्ट्रीय नागरी कॅलेंडरमध्ये,श्रावण हा वर्षाचा पाचवा महिना आहे,जो सामान्यतः जुलैच्या मध्यापासून ते ऑगस्टच्या अखेरीस सुरू होतो आणि ऑगस्टच्या अखेरीस संपतो.तमिळ कॅलेंडरमध्ये, याला आदि म्हणून ओळखले जाते आणि सौर वर्षाचा पाचवा महिना आहे.चंद्राच्या धार्मिक कॅलेंडरमध्ये, श्रावण हा अमावस्येला (अमंत परंपरेनुसार) किंवा पौर्णिमेला (पूर्णिमंत परंपरेनुसार) सुरू होतो आणि वर्षाचा पाचवा महिना आहे. श्रावण ( बंगाली : শ্রাবণ ; ज्याला श्रावण असेही म्हणतात ) हा सौर बंगाली कॅलेंडरचा चौथा महिना आहे.हा नेपाळी कॅलेंडरचा चौथा महिना देखील आहे.श्रावण हा वर्षा (पावसाळी ) चा दुसरा महिना देखील आहे.सौर आसामी कॅलेंडरमध्ये हा वर्षाचा चौथा महिना आहे आणि त्याला क्षौन म्हणतात. श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत खास मानला जातो.उत्तर भारतात ११ जुलै पासून श्रावण सुरु झाला असून महाराष्ट्रात मात्र हा महिना २५ जुलैपासून सुरू होईल.श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून महिन्याची सुरुवात होणार असून,२३ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला याचा समारोप होईल.श्रावण महिन्यात भक्त मोठ्याप्रमाणात उत्तरवाहिनी नदीवरून जल भरून आणतात व ते शिवाच्या पिंडीवर टाकून त्याचा जलभिषेक करतात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी याकाळात भक्त पूजा विधी आणि व्रत करतात.श्रावणातील सर्व सोमवार महादेवाची मनोभावे पूजा केली जाते.नियमांचे पालन करून व्रत करण्याला याकाळात महत्व आहे.तसेच आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात.असे मानले जाते की श्रावणातील पूजा आणि व्रत केल्याने शंकर भगवान प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकानमा याकाळात पूर्ण करतात.
श्रावणात भक्त मनोकामनापूर्तीसाठी सोमवारचे उपवास करतात.भगवान शंकरांना भोलेबाबा देखील म्हणतात याचे कारण म्हणजे शंकर हे भोळे आहेत असे मानतात कारण ते तुमच्या साध्या भक्तीने देखील लगेच प्रसन्न होतात आणि कामना पूर्ण करतात.त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचे पालन करून जर पूजा आणि व्रत केले नाही तर तुम्हाला इच्छित फळ मिळू शकणार नाही असे देखील बोलले जाते.पाहुयात श्रावणात किती सोमवार येतात आणि पूजा व्रत कसे करावे.
श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरचा पाचवा महिना आहे.भारताच्या राष्ट्रीय नागरी कॅलेंडरमध्ये,श्रावण हा वर्षाचा पाचवा महिना आहे,जो सामान्यतः जुलैच्या मध्यापासून ते ऑगस्टच्या अखेरीस सुरू होतो आणि ऑगस्टच्या अखेरीस संपतो.तमिळ कॅलेंडरमध्ये,याला आदि म्हणून ओळखले जाते आणि सौर वर्षाचा पाचवा महिना आहे.चंद्राच्या धार्मिक कॅलेंडरमध्ये,श्रावण हा अमावस्येला (अमंत परंपरेनुसार) किंवा पौर्णिमेला (पूर्णिमंत परंपरेनुसार) सुरू होतो आणि वर्षाचा पाचवा महिना आहे. श्रावण ( बंगाली : শ্রাবণ ; ज्याला श्रावण असेही म्हणतात ) हा सौर बंगाली कॅलेंडरचा चौथा महिना आहे.हा नेपाळी कॅलेंडरचा चौथा महिना देखील आहे.श्रावण हा वर्षा (पावसाळी ) चा दुसरा महिना देखील आहे.सौर आसामी कॅलेंडरमध्ये हा वर्षाचा चौथा महिना आहे आणि त्याला क्षौन म्हणतात .
श्रावण महिना संपूर्ण भारतीय उपखंडासाठी खूप महत्वाचा आहे,कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे.अनेक हिंदूंसाठी,श्रावण महिना हा उपवासाचा महिना आहे.बरेच हिंदू दर सोमवारी शिवाला आणि/किंवा दर मंगळवारी पार्वतीला उपवास करतात.हा पवित्र महिना हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान शिवाला समर्पित आहे.आशीर्वाद आणि आध्यात्मिक वाढ मिळविण्यासाठी भाविक या काळात विविध विधी आणि पद्धती पाळतात.या महिन्यातील मंगळवारी उपवास करणे स्थानिक पातळीवर "मंगला गौरी व्रत" म्हणून ओळखले जाते.दशमा व्रत हे दशमाला समर्पित आहे आणि गुजराती परंपरेनुसार श्रावणाच्या पहिल्या दिवशी पाळले जाते .
श्रावण महिन्याचा काळ आध्यात्मिक साधकांसाठी पवित्र सुवर्णकाळ असतो आणि तो भगवान शिवाच्या उपासनेसाठी वापरला पाहिजे.
श्रावण महिन्यात कृष्ण जन्माष्ठमी रक्षाबंधन,नारळी पौर्णिमा,नाग पंचमी,पोळा सारखे हिंदूंचे महत्वाचे सण येतात.
श्रावण हा वार्षिक कावड यात्रेचा काळ आहे,जो कंवरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवभक्तांची वार्षिक तीर्थयात्रा आहे जी उत्तराखंडमधील हरिद्वार,गौमुख आणि गंगोत्री या हिंदू तीर्थस्थळांना गंगा नदीचे पवित्र जल आणण्यासाठी जाते.अश्याप्रकारे सर्वांना श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा.
पवन थोटे,यवतमाळ ९४०४५२६७७७

Post a Comment
0 Comments